रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेतील गटनेते पदासाठी शिवसेनेकडून दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, भाजपकडून राजेश तोडणकर, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून केतन शेट्ये यांची नावे अंतिम करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. शिवसेनेकडून बाळू साळवी भाजपने राजेश तोडणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून केतन शेट्ये यांची नावे गटनेतेपदासाठी निश्चित केली आहे. त्या त्या पक्षाचा नगरसेवकांकडून या नावांना नावासाठी पसंती दर्शविण्यात आल्यानंतर आता नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा स्वाक्षरीनंतर तिन्हीही गटनेत्यांच्या नावाला मंजुरी मिळणार आहे.



