रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ४ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. विधानसभा निवडणुका नंतर प्रथमच पक्षाचा मेळावा होत असल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साहाचे वातावरण आहे. जितेंद्र आव्हाड हे पहिल्यांदाच येत असून त्यांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांनी दिली. रविवार ४ मे रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील कार्यकर्त्यांसह या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने , प्रदेश सचिव बशीर मुर्तुजा , माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे व शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी केले आहे.