Saturday, February 14, 2026

Latest Posts

हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- हातखंबा येथे बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले. यात तीन ते चार चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यात रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थी झरेवाडी येथे आपल्या घरी जात असताना या अपघातात ठार झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.