रत्नागिरी: रत्नागिरीतील ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या खेळाडूंवर घालण्यात आलेली अन्यायकारक बंदी अखेर पालकमंत्री **मा. डॉ. उदयजी सामंत** यांच्या कडक इशाऱ्यानंतर उठवण्यात आली आहे. या यशस्वी हस्तक्षेपामुळे जिल्ह्याभरातील क्रीडाप्रेमींमधून समाधान व्यक्त होत असून, सर्व खेळाडू आता १९ एप्रिल रोजी पुणे येथे होणाऱ्या द्रोणाचार्य राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
### वादाची पार्श्वभूमी आणि पालकमंत्र्यांची भूमिका
महाराष्ट्र जलतरण असोसिएशनची कमिटी सध्या बरखास्त असतानाही, तथाकथित सचिव राजू पालकर यांनी वैयक्तिक कारणातून महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खेळाडूंवर बेकायदेशीर बंदी घातल्याचे बदनामीकारक वक्तव्य करत होते. तसेच स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)याना सदर बाबतीत mailकेला असता त्यांनी महाराष्ट्र मध्ये कोणतीही फेडरेशन अस्तित्वात नसल्याचा लिखित mail पाठवला . यापूर्वीही वर्षभरापूर्वी डॉ. उदय सामंत यांनी पालकर यांना समज दिली होती. मात्र, १९ एप्रिलच्या पुणे येथील स्पर्धेसाठी खेळाडूंनी ऑनलाइन अर्ज भरताच, पालकर यांनी पुन्हा आयोजकांना या खेळाडूंना प्रवेश नाकारण्यास भाग पाडले होते.
### पालकमंत्र्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निकाल
हा अन्याय लक्षात येताच खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी तात्काळ पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पालकमंत्र्यांनी तत्काळ राजू पालकर यांना फोन लावून **’योग्य भाषे’त समज दिली.** पालकमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित आयोजकांनी दुसऱ्याच दिवशी सर्व खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याचे अधिकृत आमंत्रण दिले.
### ठळक मुद्दे:
* **अवैध बंदीला चपराक:** बरखास्त असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याची मनमानी पालकमंत्र्यांनी मोडून काढली.
* **तात्काळ कारवाई:** तक्रार प्राप्त होताच काही तासांत खेळाडूंचा मार्ग मोकळा झाला.
* **पुणे स्पर्धा:** १९ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या ‘द्रोणाचार्य राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत’ आता रत्नागिरीचे खेळाडू चमकणार. या सर्व प्रकरणाचे श्रेय खेळाडूंनी आणि पालकांनी उदयजी सामंत यांना दिले असून, राजकारणापलीकडे जाऊन खेळाडूंसाठी धावून येणाऱ्या पालकमंत्र्यांचे कौतुक होत आहे.



