रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्यावर प्रभाग क्रमांक ४ मधून श्री. इम्रान हुसैन नेवरेकर तसेच प्रभाग क्रमांक ५ मधून ऍडव्होकेट श्री. अभिलाष अतुल पिलणकर,प्रभाग क्रमांक ८ मधून श्री. सोमनाथ प्रदीप पिलणकर व प्रभाग क्रमांक ११ मधून श्री. तुषार यशवंत कांबळे या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून या उच्चशिक्षित, तरुण तडफदार उमेदवारांमुळे प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांसमोर जोरदार आव्हान निर्माण झाले आहे..मनसे व शिवसेना (उबाठा )युतीच्या चर्चा जोरात चालू असताना रत्नागिरीमध्ये मात्र युतीचा कोणताही प्रस्ताव अधिकृत मनसे पदाधिकाऱ्यांना शिवसेना ( उबाठा) कडून अद्यापही मिळालेला नाही त्यामुळे मनसेने या निवडणुकीत पुरस्कृत उमेदवार देवून पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.



