Wednesday, March 25, 2026

Latest Posts

अभ्यंकर  कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य जनजागृती पदयात्रेचे आयोजन

रत्नागिरी:  रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे   सन 2025-26  सुवर्णमहोत्सवी  वर्ष  आहे. या निमित्ताने समाजातील विविध सामाजिक प्रश्नाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रा कार्यक्रमात अमली पदार्थ विरोधी जनजागृती, प्रदूषण मुक्ती,निसर्ग संवर्धन, भ्रष्टाचार निर्मूलन, सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे, पाणीटंचाई व जलसंवर्धन, राष्ट्रीय सुरक्षा,मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण, स्त्री सुरक्षा,स्वच्छता, पर्यावरण व अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या विविध सामाजिक विषयावर पदयात्रेमध्ये फलक, घोषवाक्ये व संदेशाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
        ही पदयात्रा शुक्रवार दि. 23 जानेवारी २०२६ रोजी दु. 3.30  वाजता महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगण येथून सुरु होणार असून ते सिव्हिल हॉस्पिटल– जेल रोड नाका– माळ नाका– मारुती मंदिर पुन्हा याच मार्गाने महाविद्यालयापर्यंत येऊन समारोप होणार आहे. या पदयात्रेमध्ये संस्थेच्या कार्याध्यक्ष मा. श्रीमती शिल्पाताई पटवर्धन,उपकार्याध्यक्ष मा. श्री विजयराव साखळकर, कार्यवाह श्री सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष मा.आनंद देसाई,व इतर सन्माननीय संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, संस्थेतील इतर घटक संस्थांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. तरी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. मकरंद साखळकर  व उपप्राचार्य प्रा सुनील गोसावी यांनी या सामाजिक जनजागृती पदयात्रेमध्ये रत्नागिरी शहरातील नामांकित विविध मंडळे सामाजिक व शैक्षणिक संस्थांना  आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.