रत्नागिरी – आषाढ महिन्यातील अत्यंत श्रद्धेचा आणि परंपरेचा हा उत्सव आजपासून सुरू होत आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या आषाढ पालखी उत्सवाला आज उत्साहात प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीची पहिली ग्रामप्रदक्षिणा पार पडत असून, संपूर्ण बारा वाड्यासमवेत रत्नागिरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.



